Advertisement

2023 Lokmanya Tilak Speech in Marathi PDF Download | लोकमान्य टिळकांचे भाषण सविस्तर पणे

Lokmanya Tilak Speech in Marathi PDF Download | Lokmanya Tilak Speech in Marathi for School Students | lokmanya tilak bhashan marathi madhe | A speech contest is held in the school to celebrate the birth anniversary and death anniversary of great men and social reformers. To prepare this speech we need to know about that social reformer. In today’s post, we will see lokmanya tilak’s speech in Marathi. So that you can prepare a speech in school or college.

Lokmanya Tilak Speech in Marathi

Lokmanya Tilak Speech in Marathi PDF Download :- थोर महापुरुष आणि समाजसुधारक यांची जयंती आणि पुण्य तिथी साजरी करताना शाळेमध्ये भाषण वक्तृत्व स्पर्धा ठेवली जाते. या भाषणाची तयारी करण्यासाठी आपल्या ला त्या समाजसुधारक बद्दल माहिती असणे आवश्यक असते. आजच्या या पोस्ट मध्ये आपण लोकमान्य टिळक यांचे lokmanya tilak speech in marathi भाषण पाहुयात. जेणेकरून शाळा कॉलेज मध्ये भाषणाची तयारी तुम्हाला करता येईल.

lokmanya Tilak Bhashan Marathi | लोकमान्य टिळकांचे भाषण मराठी मध्ये

सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांन बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे क्रांतिकारी देशभक्त म्हणजे बाळ गंगाधर टिळक होय यांचा जन्म “23 जुलाई 1856” रोजी महाराष्ट्र राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. टिळकांचे लहान पणाचे नाव केशव असे होते. केशव ही टिळक घराण्याची कुलदेवता होती म्हणून केशव असे नाव ठेवले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लहानपणापासून देशप्रेमाची भावना त्यांच्यात भरलेली होती. टिळकांचे प्राथमिक शिक्षण मराठीतूनच झाले.

पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी बॅचलर ची पदवी मिळवली. टिळक लहानपणापासून ते खूपच हुशार असे होते . टिळक लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले व सोळा वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा सुद्धा मृत्यू झाला. गणित व संस्कृत हे टिळकांचे आवडते विषय होते. डेक्कन कॉलेजमध्ये असतानाच टिळकांची मैत्री गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी झाली. या मैत्रीच्या मदतीनेच त्यांनी सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम केले.

सन 1880 मध्ये त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि टिळकांचे सामाजिक जीवन एक शिक्षक आणि शिक्षण संस्थेचे संस्थापक या पद्धतीने सुरू झाले. 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले इथे त्यांनी बिनपगारी काम केले.

Read More:- Best MPSC Book List In Marathi 2023 PDF Download | MPSC पुस्तकांची यादी पीडीएफ आणि सर्वकाही

Lomanya Tilak Information | लोकमान्य टिळक यांची माहिती

देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते इंग्रज सरकारवर टीका करू लागले. याशिवाय लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरा करणे सुरू केले.

साल 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी सर्व शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले, त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले आणि केसरी वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या हक्काची जाणीव करून दिली.

1897 साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे ! असे खबळजनक लेख त्यांनी लिहिले. आपल्या वृत्तपत्रातून इंग्रजांवर टीका करणे सुरू केले. यामुळेच इंग्रजांनी टिळकांना कारावासाची शिक्षा ठोठावली. मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. आणि त्यांना भारतीय अशांततेचे जनक आणि महाराष्ट्राचा सिंह म्हणूनही ओळखले जात असे.

अशा पद्धतीने इंग्रजांशी लढत असताना, इसवी सन 1920 साली दीर्घ आजाराने लोकमान्य टिळकांचे निधन झाले. यावेळी २ लाख पेक्षा जास्त लोक उपस्तिथ होते . पंडित नेहरू व महात्मा गांधींना ही बातमी कळताच. नेहरूंनी “भारतातील एक तेजस्वी सुर्याचा अस्त झाला” असे उद्गार काढले. त्यांच्या मृत्यूने दुःखी होऊन गांधीजींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी दिली.

भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणार्या या महान नेत्याला असंतोषाचे जनक मानले जाते. असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. टिळकांचे असे काही सर्वात अविस्मरणीय भाषण ही होते. अशा या थोर समाजसुधारकाला प्रणाम करत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद..

Read More:- Marathi Numbers PDF Download | मराठी अंक अक्षर संपूर्ण माहिती जाणून घ्या पीडीएफ मध्ये

Lokmanya Tilak Speech in 10 Lines | लोकमान्य टिळक यांच्यावर १० ओळी

  1. लोकमान्य टिळक हे महान स्वतंत्र सेनानी आणि शिक्षक तसेच समाजसुधारक होते.
  2. लोकमान्य टिळकांना बाळ गंगाधर टिळक असे सुद्धा म्हंटले जायचे.
  3. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्राची सुरवात केली.
  4. टिळकांनी लोकांमध्ये एकी निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशउत्सव आणि शिवजयानी उत्सव सुरु केले.
  5. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ महाराष्ट्र मधल्या रत्नागिरी येथे झाला होता.
  6. १८७९ मध्ये त्यांनी सरकारी लॉ कॉलेज मधून एलएलबी च शिक्षण पूर्ण केले .
  7. टिळक हे संस्कृत आणि गणिताचे शिक्षक होते .
  8. लोकमान्य टिळकांनी मंडाले च्या तुरुंगांमध्ये गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला .
  9. केसरी आणि मराठा वृत्तपत्रांमधून त्यांनी इंग्रज सरकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला .
  10. १ ऑगस्ट १९२० रोजी वयाच्या ६४ व्य वर्षी त्यांचे निधन झाले.

Lokmanya Tilak Speech In Marathi PDF Download | लोकमान्य टिळकांचे भाषण

लोकमान्य टिळकांचं भाषण Lokmanya Tilak Speech in Marathi Pdf Download :- लोकमान्य टिळकांचं भाषण हे शाळे मध्ये त्यांच्या पुण्यतिथी किंवा जयंती निम्मित ठेवली जातात तसेच वक्तुत्व स्पर्धा सुद्धा ठेवली जाते. अशा वेळी भाषण pdf डाउनलोड करून तुम्ही त्याची तयारी करू शकता तसेच ह्या मधील महत्वाची माहिती तुम्हाला स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडेल .

Conclusion Of Lokmanya Tilak Bhashan Marathi

Lokmanya Tilak Bhashan Marathi:- शेवटी, लोकमान्य टिळकांच्या मराठीतील भाषणाला भारतीय इतिहासात आणि ब्रिटिश वसाहतवादाविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात खूप महत्त्व आहे. टिळकांनी दिलेल्या भाषणात एकता, राष्ट्रीय अस्मिता आणि जुलमी वसाहतवादी राजवटीविरुद्ध प्रतिकार करण्याचा शक्तिशाली संदेश दिला. मराठीतील भाषणाचे सांस्कृतिक आणि भाषिक महत्त्व ओव्हरस्टेटेड केले जाऊ शकत नाही, कारण त्याने महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातील लोकांना स्वातंत्र्याच्या उद्देशासाठी एकत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

शिवाय, हे भाषण समकालीन काळातही सुसंगत राहिले आहे, कारण ते स्वातंत्र्य आणि न्यायासाठी आपल्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून देणारे आहे. भाषणात भारतातील प्रादेशिक भाषांचे महत्त्व आणि वाढत्या जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची गरज यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

शेवटी, टिळकांच्या मराठीतील भाषणासारख्या ऐतिहासिक भाषणांचा अभ्यास केल्याने आपल्याला केवळ आपल्या भूतकाळातील अंतर्दृष्टीच मिळत नाही तर आपल्या पूर्वजांसमोरील आव्हाने आणि चांगल्या भविष्यासाठीची त्यांची दृष्टी समजून घेण्यासही मदत होते. लोकमान्य टिळकांचा वारसा आणि त्यांचा राष्ट्रीय एकात्मता आणि प्रतिकाराचा संदेश पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

FAQ Frequently Asked Questions For Lokmanya Tilak Bhshan

Q1. लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी झाला ?

Ans:-त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ महाराष्ट्र मधल्या रत्नागिरी येथे झाला होता .

Q2. लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कधी झाला ?

Ans:- १ ऑगस्ट १९२० रोजी वयाच्या ६४ व्य वर्षी त्यांचे निधन झाले .

Q3. टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरु केली ?

Ans:-लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठी हि वृतपते सुरु केली .

Q४. टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

Ans:-लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages